केंद्र सरकारने १५ ऑगस्ट २०१४ रोजी स्वच्छ भारत मिशन योजना सुरू केली आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) योजनेअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर वैयक्तिक शौचालय नसलेल्या कुटुंबांना बेसलाइन सर्वेक्षणानुसार पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालय प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळतो. २ ऑक्टोबर २०१७ रोजी पालघर जिल्हा हा राज्यातील १२ वा जिल्हा हागणदारीमुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत, सार्वजनिक शौचालय बांधकाम, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन तसेच स्वच्छता जागरूकता कार्यक्रम ग्रामपंचायत स्तरावर राबविले जातात.